शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

मलेशियात अडकलेल्या तरुणांना दिलासा, वकील मिळाला : कागलच्या ‘सीईओं’चा पुढाकार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:09 IST

सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तीन तरुणांना शनिवारी कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रवीण नाईक यांच्या पुढाकारामुळे वकील मिळाला आहे.

ठळक मुद्दे१२ डिसेंबरला तुरुंगातून सुटका होण्याची शक्यतापालकांशी संपर्क साधून पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घ्या, तुमच्या मुलांना सोडवून आणू,

सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तीन तरुणांना शनिवारी कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रवीण नाईक यांच्या पुढाकारामुळे वकील मिळाला आहे. नाईक मलेशियात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी येत्या मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी एकाच टप्प्यात न्यायालयीन प्रक्रिया राबवून या तरुणांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

सांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार व धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ इरण्णा कुंभार (वय २०, रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), मोहन अशोक शिंदे (रा. बेलवंडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर), दीपक लिंबाजी माने (रा. मानेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (रा. जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले.

मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. पण वर्र्कींग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली. सध्या हे तरुण मलेशियाच्या तुरुंगात आहेत. गुरुनाथ कुंभार याचे मेहुणे नामदेव कुंभार (रा. इस्लामपूर) यांनी याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर या तरूणांना भारतात परत आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान झाल्या आहेत.

राज्यातील चार तरुण मलेशियात अडकल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच परराष्टÑ सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु ठेवले. कागल येथील प्रवीण नाईक हे मलेशियात मुुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मुळे यांनी नाईक यांच्याशी संपर्क साधून या तरुणांना सोडविण्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु करण्याची विनंती केली. त्यानुसार नाईक यांनी शनिवारी या तरुणांना वकील मिळवून दिला. तसेच न्यायालयीन प्रक्रियेचे शुल्क भरण्यात आले आहे. या तरुणांची सुटका करण्यासाठी दोन टप्प्यात प्रक्रिया राबविली जाते. पण मुळे यांनी नाईक यांच्याशी संपर्क साधून एकाच टप्प्यात न्यायालयाची सर्व प्रक्रिया राबविण्याची विनंती केली आहे. येत्या मंगळवारी चारही तरुणांना मलेशियातील न्यायालयात उभे केले जाणार आहे. यादिवशी सुटकेवर निर्णय आहे. सुटका होताच चारही तरुणांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेण्याची विनंती मुळे यांनी केली आहे.शहर पोलिसांचा तपास संथगतीनेकौस्तुभ पवार व धीरज पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन चार दिवस होऊन गेले तरी, अजूनही शहर पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही. चार मुले मलेशियाच्या तुरुंगात अडकल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात येऊनही शहर पोलिसांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे चित्र आहे. पोलिसपुत्र कौस्तुभ पवार यामध्ये मुख्य संशयित असल्याने पोलिसांचा तपास अत्यंत संथगतीने सुरु असल्याची चर्चा आहे. पवारचा सुगावा लागत नसल्याचा पोलिस कांगावा करीत आहेत. पण तो दुसºयाच्या मोबाईलवरुन फसगत झालेल्या तरुणांच्या पालकांशी संपर्क साधून पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घ्या, तुमच्या मुलांना सोडवून आणू, असे सांगत आहे.