शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मलेशियात अडकलेल्या तरुणांना दिलासा, वकील मिळाला : कागलच्या ‘सीईओं’चा पुढाकार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:09 IST

सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तीन तरुणांना शनिवारी कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रवीण नाईक यांच्या पुढाकारामुळे वकील मिळाला आहे.

ठळक मुद्दे१२ डिसेंबरला तुरुंगातून सुटका होण्याची शक्यतापालकांशी संपर्क साधून पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घ्या, तुमच्या मुलांना सोडवून आणू,

सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तीन तरुणांना शनिवारी कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रवीण नाईक यांच्या पुढाकारामुळे वकील मिळाला आहे. नाईक मलेशियात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी येत्या मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी एकाच टप्प्यात न्यायालयीन प्रक्रिया राबवून या तरुणांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

सांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार व धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ इरण्णा कुंभार (वय २०, रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), मोहन अशोक शिंदे (रा. बेलवंडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर), दीपक लिंबाजी माने (रा. मानेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (रा. जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले.

मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. पण वर्र्कींग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली. सध्या हे तरुण मलेशियाच्या तुरुंगात आहेत. गुरुनाथ कुंभार याचे मेहुणे नामदेव कुंभार (रा. इस्लामपूर) यांनी याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर या तरूणांना भारतात परत आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान झाल्या आहेत.

राज्यातील चार तरुण मलेशियात अडकल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच परराष्टÑ सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु ठेवले. कागल येथील प्रवीण नाईक हे मलेशियात मुुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मुळे यांनी नाईक यांच्याशी संपर्क साधून या तरुणांना सोडविण्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु करण्याची विनंती केली. त्यानुसार नाईक यांनी शनिवारी या तरुणांना वकील मिळवून दिला. तसेच न्यायालयीन प्रक्रियेचे शुल्क भरण्यात आले आहे. या तरुणांची सुटका करण्यासाठी दोन टप्प्यात प्रक्रिया राबविली जाते. पण मुळे यांनी नाईक यांच्याशी संपर्क साधून एकाच टप्प्यात न्यायालयाची सर्व प्रक्रिया राबविण्याची विनंती केली आहे. येत्या मंगळवारी चारही तरुणांना मलेशियातील न्यायालयात उभे केले जाणार आहे. यादिवशी सुटकेवर निर्णय आहे. सुटका होताच चारही तरुणांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेण्याची विनंती मुळे यांनी केली आहे.शहर पोलिसांचा तपास संथगतीनेकौस्तुभ पवार व धीरज पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन चार दिवस होऊन गेले तरी, अजूनही शहर पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही. चार मुले मलेशियाच्या तुरुंगात अडकल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात येऊनही शहर पोलिसांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे चित्र आहे. पोलिसपुत्र कौस्तुभ पवार यामध्ये मुख्य संशयित असल्याने पोलिसांचा तपास अत्यंत संथगतीने सुरु असल्याची चर्चा आहे. पवारचा सुगावा लागत नसल्याचा पोलिस कांगावा करीत आहेत. पण तो दुसºयाच्या मोबाईलवरुन फसगत झालेल्या तरुणांच्या पालकांशी संपर्क साधून पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घ्या, तुमच्या मुलांना सोडवून आणू, असे सांगत आहे.